
मोदी सरकारचे लोकोपयोगी कार्य घरोघरी पोहोचवावे!
मोदी सरकारचे लोकोपयोगी कार्य घरोघरी पोहोचवावे!
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनात व मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने लोकहिताचे निर्णय घेतले.. ही ९ वर्षे विकास, सुरक्षा व राष्ट्राचा सन्मान वाढवणारी ठरली आहेत. ही विशेष उपलब्धी घरोघरी पोहचविण्यासाठी ‘मोदी @९’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.
दि.३० मे २०२३ रोजी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दिनांक ३० मे ते ३० जून २०२३ या कालावधीत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जे.पी.नड्डा साहेब यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘विशेष जनसंपर्क अभियान’ संपन्न होत असून यात जिल्हा, मंडळ, शक्तीकेंद्र आणि बूथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.
या अभियानात लोकसभा व विधानसभा मतदारसंघात बूथ स्तरावर लाभार्थी, समाजातील विविध घटक, ज्येष्ठ कार्यकर्ते, मिडियातील प्रभावी व्यक्तींशी संपर्क करुन केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवली जाणार आहे. त्यानुसार लोकसभा व विधानसभा मतदारसंघात अभियान प्रारंभ रॅली, संपर्क से समर्थन, विशाल जाहीर सभेचे आयोजन, पत्रकार परिषद, बुध्दीवंताचे संमेलन, सोशल मिडीयातील प्रभावशाली व्यक्ती मेळावा, व्यापारी संमेलन, विकास तिर्थ, ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत स्नेहभोजन व संवाद, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलन, आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्स, घरोघरी संपर्क अभियान असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात भाजपा-शिवसेना महायुती सरकारने गेल्या १० महिन्यांत राज्याला विकासपथावर आणले आहे. वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अमृतकाळातील राज्याचा पहिला अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये महाराष्ट्राला वैभवशाली राज्य घडविण्यासाठी धोरणात्मक दिशा स्पष्ट करुन पाऊले टाकली आहेत. याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा धाराशिवच्या वतीने अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला प्रदेश चिटणीस श्री.किरण पाटिल व जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री.दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.सतीश दंडनाईक, श्री.संताजी चालुक्य, ॲड.श्री.खंडेराव चौरे, ॲड.श्री.अनिल काळे, ॲड श्री.जहीर चौधरी, श्री.मकरंद पाटील, सौ.अस्मिताताई कांबळे, युवराज नळे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंहराजे निंबाळकर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.नंदाताई पनगुडे, सरचिटणीस श्री.नितीन भोसले, श्री.प्रदीप शिंदे, मंडळाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#पंतप्रधान #मोदी #सरकार #यशस्वी #कारकीर्द #जनसंपर्क #अभियान #लोकसभा #धाराशिव #महाराष्ट्र #PM #modiji #central_government #India #Maharashtra #dharashiv