
अतिवृष्टी व सततच्या पावसाने बाधित पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत…सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून घ्यावेत !
अतिवृष्टी व सततच्या पावसाने बाधित पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत…सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून घ्यावेत !
आश्लेषा नक्षत्राच्या पावसाचा हजारो हेक्टर वरील पिकांना मोठा फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच गावातील सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांचेही पंचनामे करण्यात येणार आहेत.
ज्या गावांमध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तेथील शेतकऱ्यांनी व गावातील प्रमुखांनी पुढाकार घेऊन पिकांचे पंचनामे करून घ्यावेत. या नंतर तयार करण्यात येणारा अहवाल, अनुदानासाठी राज्य सरकारकडे पाठविला जाईल. पिक विम्याच्या आगाऊ २५% नुकसान भरपाईची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.