
जनता दरबाराचे आयोजन
नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हे लोकप्रतिनिधी म्हणून मला माझे कर्तव्य वाटते…
पंचायत समिती उस्मानाबाद येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या समस्या मांडल्या. त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करणार आहोत.