
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत पांगरधरवाडी, तुळजापूर येथे कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाची पाहणी व यंत्रपूजन संपन्न झाले..
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत पांगरधरवाडी, तुळजापूर येथे कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाची पाहणी व यंत्रपूजन संपन्न झाले..
‘मोदी @९’ अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब धाराशिव जिल्ह्यात जाहीर सभेसाठी आले होते. यावेळी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाची पाहणी व यंत्रपूजन संपन्न झाले.
आदरणीय डॉ.पद्मसिंह पाटील साहेबांना कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी मोठी राजकीय किंमत मोजावी लागली होती. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी, आपल्या दुष्काळी धाराशिव जिल्ह्याच्या शाश्वत पाण्यासाठी, मागील २३ वर्षांपासून सुरू असलेला भगीरथ प्रयत्नांना या निमित्ताने आता यश येऊ लागले आहे..
आदरणीय डॉक्टर साहेबांनी अतिशय आक्रमकपणे कै.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सहकार्याने २१ टी.एम.सी. पाण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून घेतली. मात्र नंतरच्या काळात कामाची गती कमी होत गेली. २००४ ते २०१४ या १० वर्षात आघाडी सरकारने केवळ ९% काम पूर्ण केले. तर २०१९ ते २०२२ दरम्यान महाविकास आघाडी सरकारने ३ वर्षात जेमतेम ४% काम पूर्ण केले. म्हणजेच एकूण फक्त १३% काम करण्यासाठी त्यांना १३ वर्ष लागले.
तर दुसरीकडे २०१४ ते २०१९ दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.श्री.गिरीशजी महाजन साहेब यांनी ५ वर्षात ३३% काम पूर्ण केले व महायुती सरकार असताना १०० दिवसांच्या आत १,१५,००० हेक्टर शाश्वत सिंचन प्रकल्पाच्या रु.११,७२६ कोटींच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली..
यावेळी बोलताना या प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेतील कामे जून-२०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना.फडणवीस साहेब यांनी सांगताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.. मराठवाड्याची तहान भागवण्याच्या दृष्टीने कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प महत्वाचा आहे. मात्र २००५ पासून या प्रकल्पाची केवळ चर्चाच चालू होती. अखेरीस फडणवीस साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये हा प्रकल्प सुरु केला.
डिसेंबर-२०२२ मध्ये या प्रकल्पाला तब्बल ११७२६.१९ कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी तात्काळ निविदा काढून उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ ची उर्वरीत कामे देखील सुरु करण्यात आली आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव या तालुक्यातील ३६ गावांना तर तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील ५५ गावांना पाणी मिळणार आहे. एकूण ९१ गावातील २५ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या धाराशिव जिल्ह्यातील योजनांसाठी ५५९.७५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातले कृष्णा खोऱ्यातील पाणी मार्च-२०२४ पर्यंत मराठवाड्यात आणण्याचे भाग्य आपल्याला मिळणार आहे. यासाठी सर्व अधिकारी आणि पदाधिकारी युद्ध पातळीवर काम करणार आहेत.. टप्प्याटप्प्याने हे पाणी संपूर्ण जिल्ह्याला मिळेल. धाराशिवच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या या प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल फडणवीस साहेबांचे पुनश्च एकदा मनःपूर्वक आभार..
#पाणी #प्रश्न #कृष्णा #मराठवाडा #धाराशिव #धरण #water #krushna #project #Dharashiv #dharashiv #maharashtra #marathwada #droughtfreemaharashtra #water #irrigation #krishnamarathwada #DevendraFadnavis #bjp