
शासन आपल्या दारी उपक्रमाचे तुळजापूर येथे उद्घाटन संपन्न!
शासन आपल्या दारी उपक्रमाचे तुळजापूर येथे उद्घाटन संपन्न!
शिंदे-फडणवीस सरकारने अतिशय स्तुत्य असा लोकाभिमुख ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली असून, या कालावधीत वेगवेगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले आहेत. तुळजापूर तालुक्यातून १२ हजार अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी येथे आयोजित कार्यक्रमात ९५० लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या गावात प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचे प्रश्न शासकीय अधिकारी मार्गी लावत आहेत. तसेच देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छ पाणी देण्यासाठी ‘हर घर जल’ हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्य सरकारने महिलांसाठी प्रवासाकरता बसमध्ये ५०% सूट दिली आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिच्या नावावर १ लाख रुपये जमा होणार अशा अनेक योजना केंद्र व राज्य सरकारने नागरिकांना दिल्या आहेत.
तिर्थक्षेत्र तुळजापूर लवकरच रेल्वे मार्गावर येणार आहे, कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणीही लवकरच मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायमच कटिबद्ध आहोत. तुळजापूर मंदिर परिसर, नळदुर्ग, तेर अशा विविध ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी भर देण्यात येत आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्या मंदिराच्या माध्यमातूनही टप्याटप्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करता येणार आहे.
#शासन_आपल्या_दारी #महाराष्ट्र #भाजपा #योजना #लाभार्थी #धाराशिव #तुळजापूर #tuljapur #dharashiv #BJP #Maharashtra