
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक-२०२३ संदर्भात श्रीनाथ लॉन्स, तुळजापूर येथे ‘मतदार संवाद मेळावा’ संपन्न झाला..
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक-२०२३ संदर्भात श्रीनाथ लॉन्स, तुळजापूर येथे ‘मतदार संवाद मेळावा’ संपन्न झाला..
धाराशिवच्या जिव्हाळ्याचा कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचा प्रश्न डॉ.साहेबांनी लाऊन धरला होता, त्याची पूर्तता आता राज्य सरकारने केली आहे.. यामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने ११,६०० कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे.
त्याचप्रमाणे धाराशिवच्या वॉटर ग्रीड, एमआयडीसी, औद्योगिक वसाहत, टेक्सटाईल प्रकल्प अशा अनेक महत्वपूर्ण कामांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो, त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची अंमलबजावणी देखील सुरू आहे.
शेतकऱ्यांसाठी अजूनही अनेक सुविधा, प्रकल्प आपल्याला निर्माण करायचे आहेत. मात्र त्यासाठी राजकीय ताकद दाखवावी लागेल. त्या अनुषंगाने बाजार समितीची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे. सर्वांनी ‘विमान’ या चिन्हा समोर फुलीचा शिक्का मारून जबाबदारी पार पाडावी ही विनंती आहे..
#बाजार #समिती #निवडणूक #धाराशिव #election #dharashiv