
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली..
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली..
अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे धाराशिव तालुक्यातील वाडी (बामणी) तसेच तुळजापूर तालुक्यातील मोर्डा-तडवळा गावांमधील शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, ज्वारी, कांदा, टोमॅटो, मिरची, द्राक्षे, अंबा, टरबूज, कलिंगड अशा सर्वच पीकांचा समावेश आहे. अनेक घरांची पडझड झालेली असून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला.
महसूल प्रशासनाकडून पंचनामे प्राप्त होताच राज्य सरकार कडून तात्काळ मदत दिली जाईल असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना दिले आहे. हे “आपले सरकार” असून शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाणार नाहीत. याची काळजी आपण निश्चितच घेऊ..
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
#पाऊस #नुकसान #मदत #धाराशिव #rain #damage #help #dharashiv