
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा फकीरा कादंबरी, गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा फकीरा कादंबरी, गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
आपला जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असल्याने या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या अनुषंगाने ‘आत्मनिर्भर धाराशिव’ च्या माध्यमातून अनेक तरुणांनी व्यवसाय करणे अपेक्षित आहे.
केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येत असलेली ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना’ तसेच ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना’ यांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक नवउद्योजकांना भांडवल उपलब्ध होऊ शकते. यामुळे आपल्यासोबत इतरांनाही रोजगार मिळू शकतो. सदरील योजनेबाबत शक्य होईल ती मदत आपण करणार आहोत. अधिक माहितीसाठी आपल्या कार्यालयात संपर्क साधावा..
आयोजक श्री.सचिन लोंढे यांनी सदरील समारंभ आयोजित करून अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. अधिकाधिक नागरिकांना यातून प्रेरणा मिळेल. अर्थात या सन्मानाने मान्यवरांची जबाबदारीही अजून वाढली आहे, असेही मत भारतीय जनता पार्टी कार्यालय, प्रतिष्ठान भवन येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.