skip to Main Content
रोजगार निर्मिती प्रस्ताव नोंदणी अभियानाच्या पहिल्याच दिवशीच १९९५ अर्ज !

रोजगार निर्मिती प्रस्ताव नोंदणी अभियानाच्या पहिल्याच दिवशीच १९९५ अर्ज !

रोजगार निर्मिती प्रस्ताव नोंदणी अभियानाच्या पहिल्याच दिवशीच १९९५ अर्ज !
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांची “आत्मनिर्भर भारत” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर धाराशिव’ अंतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) प्रस्ताव नोंदणी शिबिराचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी कार्यालय, धाराशिव येथे करण्यात आला होता.
जिल्ह्यातील नागरिकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी, चालू व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी अनुदानासह कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध करून दिले जाते. “बूथ तेथे उद्योजक” या संकल्पनेतून जिल्ह्यात अनेक मार्गदर्शन शिबिरे आपण आयोजित करून मार्गदर्शन केले आहे. किंबहुना अनेकांना कर्ज मंजूर करून देण्यासाठी मदतही केली आहे. या योजने अंतर्गत कर्ज धारकांना निकषानुसार २५ /३५% अनुदानही देण्यात येते.
या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी दि.२५ जुलै २०२२ ते २९ जुलै २०२२ दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये प्रस्ताव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्ताव नोंदणी केलेल्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून कर्ज मंजुरी पर्यंत आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करणार आहोत. सदरील योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड साहेब व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री मा.ना.श्री.नारायण राणे साहेब यांचे सहकार्य लाभत आहे.
या आर्थिक वर्षात सदरील योजने अंतर्गत ३,००० प्रकल्पांना मंजुरी मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठरविले असून आतापर्यंत जवळपास ८५० प्रकल्पांना जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा आवश्य लाभ घ्यावा.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.