
तालुकास्तरीय उद्योग व व्यावसायिक मेळाव्याच्या आयोजन प्रसंगी जळकोट, ता.तुळजापूर येथे युवकांशी संवाद साधला..
तालुकास्तरीय उद्योग व व्यावसायिक मेळाव्याच्या आयोजन प्रसंगी जळकोट, ता.तुळजापूर येथे युवकांशी संवाद साधला..
असा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल श्री.गणेशजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी परिश्रमपूर्वक असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ हे प्रेरणादायी शब्द दिले आहेत. त्याची सुरुवात अशा उपक्रमांनी होत आहे, याचे विशेष समाधान वाटते. जोपर्यंत प्रत्येक घटक स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही तोपर्यंत भारत आत्मनिर्भर होणार नाही.. यासाठी आपल्याला त्यांनी दिलेली चतुःसुत्री वापरावी लागेल. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास “
लवकरात लवकर एमआयडीसीच्या माध्यमातून एक नवीन औद्योगिक क्षेत्र सुरू व्हावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या असा ठराव सर्व गावकऱ्यांच्या संमतीने पास करण्यात आला. त्याचप्रमाणे नळदुर्ग हा स्वतंत्र तालुका निर्माण व्हावा अशीही राज्य सरकारला विनंती करण्यात आली.
प्रत्येकाचे प्रयत्न हेच आपल्या जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी मदत करणार आहेत. त्यानुसार सर्वांनी सक्षम होण्याकडे भर द्यावा. जेणेकरून आपला जिल्हा सक्षम होईल, असे विचार या निमित्ताने मांडले.